Posts

मोक्ष : टाईट इफेक्ट

 जनरेशन z साठी श्रीधर तिळवे नाईक  १ तुम्ही येण्यापूर्वी बरच काही घडलं होतं  महत्त्वकांक्षेला गरुड फुटण्याऐवजी मर्डर फुटला होता  सत्तेवर शिवाजी महाराजांनी येण्याएवजी  केवळ गणपतीला केला जाणारा देखावा आला होता  आणि तो दरवर्षी बदलत होता  एक उद्दामपणा  उड्डाणपणा म्हणून सेटल झाला होता  एक खोटा गर्व  वर्णाच्या अहंकारात लोळत होता  राजकीय अचूक राहण्याची माझी क्षमता  संपत चालली होती  मी एक्झॉस्ट होणार होतो  आणि मला तडाखा मारला जात होता  तुम्ही येण्यापूर्वी बरंच काही घडत होतं  २ मी तंत्र शिकवत होतो आणि तिकडे अशोक वृक्षाखाली  एक निवडुंग उगवत होता  एक दैदीप्यमान मोक्षता आणि दुसरीकडे भोंगळ वक्षता  दक्षतांचा सारा खटाटोप फक्त टोप्या घालणारा  लेडीज सूर्योदय  हिडीस सूर्यास्त बनत चाललेला  ज्याला त्वचाही कळत नव्हती  तो आत्म्यावर आरुढ  प्राण जाण्याची वेळ  आणि घड्याळे तुटत चाललेली  ब्लॅकमेल म्हणून केले गेलेले व्हिडिओ  व्हाईट कॉल म्हणून परतलेले  आता या व्हाईट कॉलर लोकांचे...
विसाव्या शतकात शैव लोकांनी आपण हिंदू धर्माचे भाग आहोत हे का स्वीकारले श्रीधर तिळवे नाईक  हा एक असा प्रश्न आहे जो मला सातत्याने विचाराला जातो आणि हा अनेकदा आचार्य श्रीधर तिळवे यांना विचारला जातो त्याचे उत्तरही मी शैव आचार्य म्हणून अनेकदा दिलेले आहे. आता पुन्हा देतो . सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ब्रिटिशांचा सर्वात शेवटचा लढा जो झाला तो मुस्लिमांशी झाला नाही तो शैव धर्मी लोकांशी झाला दक्षिणेमध्ये होळकर घराणे आणि उत्तरेमध्ये शीख लोकांनी ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या आदिवासी जमाती ज्या मूळच्या शैवच आहेत त्या कायमच ब्रिटिश सत्ते विरोधात बंड करत राहिल्या . याला प्रथम छेद दिला तो महात्मा फुले यांनी त्यांनी प्रथमच स्पष्ट आणि स्वच्छपणे स्वीकार केला की ही लढाई आता शक्य आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी पूर्णपणे शस्त्र त्याग केला त्याचा फार खोलवर परिणाम होत गेला p कधी नव्हे तो शैव लोकांनी आपला लढण्याचा धर्म म्यान केला शस्त्र बाजूला ठेवली हे फार चांगले झाले असे मला कधीही वाटले नाही किंबहुना महात्मा फुले यांनी असे काहीतरी करून...
 आदि शैव श्रुती श्रीधर तिळवे नाईक  शैव श्रुती ही जगातली सर्वात पहिली श्रुती आहे आणि तिचा उगम सुद्धा आता सापडत नाही इतकी ती प्राचीन आहे त्यामुळेच आता जे काही वर्तमान आहे त्यातून योग्य तो निष्कर्ष काढावा लागतो अनेकदा मला विचारले जाते की आदिशैव धर्म होता म्हणजे काय होता तर त्याचा प्राचीन टप्पा खरे तर अति प्राचीन टप्पा सर्वात प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आदिवासी संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे त्याशिवाय तो कळत नाही . भारतामध्ये सर्वांना शंकर ही देवता माहिती आहे पण तिचा उगम कुठून आला हे अनेकदा माहीत नसते . शंकर या शब्दाचा मूळ अर्थ शंका घेणारा असाच होता आणि हे नाव त्याला नंतर मिळाले हे मी मागेच एका लेखात सांगितलेले आहे त्याचे मूळ नाव शंभू ज्याला आता मराठीत आपण संभाजी म्हणतो कारण शिवाजी महाराजांच्या लाडक्या पुत्राचे ते नाव होते . आज सुद्धा शंभू हे नाव भारतामध्ये सर्व वर्ण जाती आणि भारतीय धर्मांच्या मध्ये आवडीने ठेवले जाते याचे कारण शंकरावर भारताचे सर्वाधिक परिणाम आहे प्रेम आहे हे प्रेम नष्ट करण्याचे सर्व नटदृष्ट उद्योग करण्यात आले परंतु ते टिकले नाहीत . ज्या ताटात खाल्ले ...
महादेव 
 एक में  (संदर्भ मी महेश पवार किशोर कदम इन अपना धाबा ) श्रीधर तिळवे नाईक  १ भक्त प्रसाद खातायत  आणि देव उपाशी आहेत  रंग उडून गेलेल्या पिसांचा पिसारा पहात  आयुष्याचा मोर नाचतो आहे  प्रवासाच्या शेवटी नॉशिया आलाय प्रवाशाला  आणि बुलेट ट्रेन कुठेच पोहचलेली नाही  कयामतीपर्यंत काया माती खात राहणार काय ? मेड्युसा ह्या देशातील कशाकशाला दगड बनवणार आहे ? कि देशच स्वतःला दगड बनवून थांबणार आहे ? २ एक मे म्हणजे श्रमिकांचा उत्सव  आणि श्रमिकांना आता त्याचा विसर पडलाय  एक मे म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचा उत्सव  आणि मराठी लोकांना मराठी भाषेचा मराठी कण्याचा विसर पडलाय  मराठी फक्त श्रमिकांची भाषा बनलीये काय ? मराठी राज्य हे फक्त श्रमिकांनी स्थापन केलेलं राज्य होतं का ? एक मे आलाय २४ एप्रिलला माझ्या दारी  महेश पवारच्या मागोमाग  मला कळत नाहीये  महेश एक मे आहे कि  कि एक मे महेश पवार आहे ? ३ एक मे म्हणतोय  चल चल अपना ढाबा जाऊ  मी पितो आणि आपण मस्त जेऊ  मी म्हणतोय  मॅच आहे आयपीएलची  एक मे ठाम  तू ...